सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा तालुक्यातील किल्ला गावातील रहिवासी नितेश धर्मा मुंढे यांच्या आयुष्यात लहानपणापासूनच दुःखाचे डोंगर उभे राहिले. आई-वडिलांचे छत्र लवकर हरपल्यानंतर त्यांचा सांभाळ बहिणीने केला. मात्र काळाने तिलाही आजारपण दिल्याने नितेश पुन्हा एकाकी झाले. एकट्याने जीवन जगत असताना नितेश यांना संधिवाताचा गंभीर त्रास सुरू झाला. चालणे, बसणे आणि दैनंदिन कामे करणेही कठीण बनले. परिस्थिती अत्यंत बिकट होत गेली. मित्र परिवाराने शक्य ती मदत केली, पण गरज मोठी असल्याने सर्वांना मर्यादा येत होत्या. अशा कठीण प्रसंगी किल्ला गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय बामुगडे यांनी…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न तळा-नझीर पठाण- दिनांक ८/मे/३०२६ रोजी मौजे तळा येथील कुणबी भवन, तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्वाती पाटील तहसीलदार तळा मनिषा वजाले ceo नगरपंचायत तळा,उप नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शिवसेना शहरप्रमुख राकेश वडके, नगरपंचायती मधील सर्व नगरसेवक सर्व पंचायत समिती सदस्य ,पत्रकार किशोर पितळे, संध्या पिंगळे , तसेच तहसील कार्यालया तळा येथील तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक,कार्यक्रमा अंतर्गत ३६ उत्पन्नाचे दाखले,६ हयात दाखले ७/१२,उतारे३ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजने चा लाभ देण्यात आला, नगरपंचायी मार्फत ४ जन्म…
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन पुणेच्या अध्यक्षपदी मिलिंद वाळंज यांची निवड अलिबाग(रत्नाकर पाटील) जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील आणि संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार शरद बुट्टे पाटील आणि पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या उपस्थितीत मिलिंद वाळंज यांची पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष पदीनिवड करण्यात आली. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन ही देशातील 22 राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या न्याय हक्कासाठी कार्य करणारी संस्था आहे मागील चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी संस्थेच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये अँड.प्रशांत केंजळे यांच्या वतीने दिनांक 29 मे 2025 रोजी याचिका दाखल करण्यात…
ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के,८८.६०% गुण मिळवून सेजल शेडगे प्रथम. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तसेच खांब विभागात इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मंजुळा एज्युकेशन वेल्फेअर अँड सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा १० वी चा निकाल १०० % इतका लागला असून ८८.६० % गुण संपादित करून सेजल शेडगे ही वर्गात सर्व प्रथम आली आहे. ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब या शाळेचा द्वितीय वर्ष इयत्ता दहावी चा वर्ग असतानाच प्रथम वर्षा प्रमाणेच येथील विद्यार्थी वर्गाने त्यांचा पावलावर पाऊल उचलत यशस्वी गुण मिळवून शाळेला शंभर टक्के निकाल देत गुणांची बाजी मारली असून सलग दुसऱ्या वर्षी या…
समाजएकता आणि जनकल्याणासाठी महान व्यक्तींच्या कार्याचा आदर्श महत्वाचा – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) कर्मवीर अण्णा, एन. डी. पाटील, दि. बा. पाटील, जनार्दन भगत साहेब या सर्वांनी समाजहिताच्या दृष्टिकोनातून प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीला दिला पाहिजे आणि त्याच मार्गाने वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजात एकता, प्रगती आणि जनकल्याणाची भावना अधिक दृढ होईल, असे मत थोर दानशूर व्यक्तिमत्व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड येथे केले. कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा…
अलिबागच्या जुळ्या बहिणींची दहावीत चमकदार कामगिरी: सौम्या-अस्मि पाटील दोघींनाही 92% पेक्षा जास्त गुण सौम्याला 92.40% तर अस्मिला 92.20%; ‘एकत्र अभ्यास, एकसारखे यश’ अलिबाग (रत्नाकर पाटील): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये अलिबाग तालुक्यातील शेखाचेगाव-कनकगिरी येथील जुळ्या बहिणींनी नेत्रदीपक यश संपादन करत तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. सौम्या अमित पाटील हिने 92.40% तर तिची जुळी बहीण अस्मि अमित पाटील हिने 92.20% गुण मिळवले आहेत. कौतुकाची बाब म्हणजे दोघींच्या गुणांमध्ये फक्त 0.20 टक्क्यांचा फरक आहे. दोघींनाही जवळपास समान गुण मिळाल्याने ‘जुळ्या बहिणींची कमाल’ अशी चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्यात रंगली आहे. दोघीही जन्मापासून एकत्र,…
रायगडचा एसएससी निकाल ९५.०३ टक्के मुलींनी मारली बाजी पोलादपूर तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक अलिबाग(रत्नाकर पाटील) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या (एसएससी) निकालात रायगड जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.०३% लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. तालुकानिहाय निकालात पोलादपूर तालुक्याने ९७.६२% निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रायगड जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एकूण ३५,४७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३५,२१७ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. यातील ३३,४६९ विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर सर केले आहे जिल्ह्यातील निकालाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व १५ तालुक्यांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा…
आदिशक्ति अभियानात वाडगांव ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय झेप तालुका व जिल्ह्यात प्रथम क्रमांकानंतर राज्यस्तरीय समितीकडून परीक्षण अलिबाग(रत्नाकर पाटील)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “आदिशक्ति अभियान” अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव, ता. अलिबाग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरीय तसेच जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर दि. ०७ मे २०२६ रोजी राज्यस्तरीय समितीने वाडगांव ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांचे परीक्षण केले. यावेळी कोकण विभागाच्या विभागीय उपआयुक्त श्रीम. सुवर्णा पवार तसेच परिविक्षा अधिकारी श्रीम. ओव्हाळ यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेतला. महिला व बाल विकास विभाग, ग्रामविकास, शिक्षण व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध योजनांची माहिती घेऊन समितीने समाधान व्यक्त…
वरसे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचा गंभीर प्रश्न; बोगस बिलांचा संशय ? नागरिक संतप्त रोहा:(समीर बामुगडे ) रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. नाकोडा किराणा माला परिसरातून जाणाऱ्या या रस्त्यावर खाली गटार असून वर केवळ डांबराचा थर टाकण्यात आल्याने हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. वाहतूक करताना वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असून, एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वेळा निधी मंजूर झाला, तसेच काम पूर्ण झाल्याची बिलेही काढण्यात आली. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब होत चालली…
जिध्द,चिकाटी,आत्मविश्वासा च्या बळावर कु.पुष्पा रामाणे मुंबई पोलीस दलात दाखल. तळा-किशोर पितळे- जिध्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर महत्वाकांक्षा पुर्ण होते हे तळा शहरातील भोईरवाडी येथील बाळकृष्ण रामाणे किरकोळ भाजीपाला व्यवसायीक लेकीने आकाशाला गवसणी घालून पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले .अतिशय दुर्गम व डोगंराळ भागात वसलेल्या तळा शहरात वाढलेल्या पुष्पाने सिद्ध करून दाखवले आहे.पुष्पा हि अतिशय चुणचुणीत मुलगी उच्च शिक्षण पूर्ण करून पोलीस होण्याची ईच्छा असल्याने “स्वराज्य करिअर अँकँडमी”मध्ये एडमिशन घेतले.मुलीसाठी आई वडीलांनी अपार कष्ट करून मुलीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक बळ दिले.आई वडीलां च्या कष्टाची किंमत ठेवून अहोरात्र मेहनतीच्याजोरावर पुष्पाने ११एप्रिल२६ रोजी पोलीस भरती परीक्षा दिली त्या मेहतीचे फलीत २मे२६रोजी…

