समाजएकता आणि जनकल्याणासाठी महान व्यक्तींच्या कार्याचा आदर्श महत्वाचा – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) कर्मवीर अण्णा, एन. डी. पाटील, दि. बा. पाटील, जनार्दन भगत साहेब या सर्वांनी समाजहिताच्या दृष्टिकोनातून प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीला दिला पाहिजे आणि त्याच मार्गाने वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजात एकता, प्रगती आणि जनकल्याणाची भावना अधिक दृढ होईल, असे मत थोर दानशूर व्यक्तिमत्व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड येथे केले. कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
अलिबागच्या जुळ्या बहिणींची दहावीत चमकदार कामगिरी: सौम्या-अस्मि पाटील दोघींनाही 92% पेक्षा जास्त गुण सौम्याला 92.40% तर अस्मिला 92.20%; ‘एकत्र अभ्यास, एकसारखे यश’ अलिबाग (रत्नाकर पाटील): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये अलिबाग तालुक्यातील शेखाचेगाव-कनकगिरी येथील जुळ्या बहिणींनी नेत्रदीपक यश संपादन करत तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. सौम्या अमित पाटील हिने 92.40% तर तिची जुळी बहीण अस्मि अमित पाटील हिने 92.20% गुण मिळवले आहेत. कौतुकाची बाब म्हणजे दोघींच्या गुणांमध्ये फक्त 0.20 टक्क्यांचा फरक आहे. दोघींनाही जवळपास समान गुण मिळाल्याने ‘जुळ्या बहिणींची कमाल’ अशी चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्यात रंगली आहे. दोघीही जन्मापासून एकत्र,…
रायगडचा एसएससी निकाल ९५.०३ टक्के मुलींनी मारली बाजी पोलादपूर तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक अलिबाग(रत्नाकर पाटील) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या (एसएससी) निकालात रायगड जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.०३% लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. तालुकानिहाय निकालात पोलादपूर तालुक्याने ९७.६२% निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रायगड जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एकूण ३५,४७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३५,२१७ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. यातील ३३,४६९ विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर सर केले आहे जिल्ह्यातील निकालाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व १५ तालुक्यांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा…
आदिशक्ति अभियानात वाडगांव ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय झेप तालुका व जिल्ह्यात प्रथम क्रमांकानंतर राज्यस्तरीय समितीकडून परीक्षण अलिबाग(रत्नाकर पाटील)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “आदिशक्ति अभियान” अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव, ता. अलिबाग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरीय तसेच जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर दि. ०७ मे २०२६ रोजी राज्यस्तरीय समितीने वाडगांव ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांचे परीक्षण केले. यावेळी कोकण विभागाच्या विभागीय उपआयुक्त श्रीम. सुवर्णा पवार तसेच परिविक्षा अधिकारी श्रीम. ओव्हाळ यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेतला. महिला व बाल विकास विभाग, ग्रामविकास, शिक्षण व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध योजनांची माहिती घेऊन समितीने समाधान व्यक्त…
वरसे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचा गंभीर प्रश्न; बोगस बिलांचा संशय ? नागरिक संतप्त रोहा:(समीर बामुगडे ) रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. नाकोडा किराणा माला परिसरातून जाणाऱ्या या रस्त्यावर खाली गटार असून वर केवळ डांबराचा थर टाकण्यात आल्याने हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. वाहतूक करताना वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असून, एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वेळा निधी मंजूर झाला, तसेच काम पूर्ण झाल्याची बिलेही काढण्यात आली. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब होत चालली…
जिध्द,चिकाटी,आत्मविश्वासा च्या बळावर कु.पुष्पा रामाणे मुंबई पोलीस दलात दाखल. तळा-किशोर पितळे- जिध्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर महत्वाकांक्षा पुर्ण होते हे तळा शहरातील भोईरवाडी येथील बाळकृष्ण रामाणे किरकोळ भाजीपाला व्यवसायीक लेकीने आकाशाला गवसणी घालून पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले .अतिशय दुर्गम व डोगंराळ भागात वसलेल्या तळा शहरात वाढलेल्या पुष्पाने सिद्ध करून दाखवले आहे.पुष्पा हि अतिशय चुणचुणीत मुलगी उच्च शिक्षण पूर्ण करून पोलीस होण्याची ईच्छा असल्याने “स्वराज्य करिअर अँकँडमी”मध्ये एडमिशन घेतले.मुलीसाठी आई वडीलांनी अपार कष्ट करून मुलीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक बळ दिले.आई वडीलां च्या कष्टाची किंमत ठेवून अहोरात्र मेहनतीच्याजोरावर पुष्पाने ११एप्रिल२६ रोजी पोलीस भरती परीक्षा दिली त्या मेहतीचे फलीत २मे२६रोजी…
*मनसेचा इशारा: नागोठणेतील धार्मिक कमान तोडफोडीवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आमरण उपोषण* प्रतिनिधी दिपक सोनावणे नागोठणे येथील प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली हजरत मीरा मोहम्मद शहा बाबा यांच्या नावाची कमान १ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक पाडल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कमान ही नागोठणेतील नागरिकांच्या श्रद्धेचा विषय मानली जात होती. अशा प्रकारची तोडफोड ही निषेधार्ह असून समाजात तणाव निर्माण करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, घटना घडून अनेक दिवस उलटूनही अद्याप संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये…
रायगड जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीचा महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्तांकडून गौरव हा रायगड जिल्हयाच्या सहकारासाठी अभिमानास्पद क्षण जिल्हा उपनिबंधक- तनवीर पाटील अलिबाग (रत्नाकर पाटील) पुणे येथे वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट येथे झालेल्या राज्य शासन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त सभेमध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नोंदविलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बँकेचे विशेष कौतुक केले. बँकेने चालू आर्थिक वर्षात आपल्या ठेवींमध्ये तब्बल २६ टक्क्यांनी वाढ नोंदविल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करताना, “रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही प्रगती राज्यातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून बँकेच्या व्यवस्थापनाने केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे,” असे गौरवोद्गार काढले. ही बाब संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार…
सारा वर्तकचा विश्वविक्रम; कमी वयात ३६ किमी समुद्री अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान जलतरणपटू म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद अलिबाग(रत्नाकर पाटील) अलिबाग येथील अवघ्या ७ वर्षांच्या सारा अभिजीत वर्तक हिने आपल्या अद्वितीय जिद्द आणि धैर्याच्या जोरावर जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ९ डिसेंबर २०२५ रोजी साराने अरबी समुद्रात धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे अत्यंत आव्हानात्मक तब्बल ३६ किमी अंतर एकट्याने अवघ्या ९ तास ३२ मिनिटांत पोहत पूर्ण करत सर्वात लहान वयाची जलतरणपटू म्हणून इतिहास रचला. आता तिच्या या पराक्रमाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली असून ३० एप्रिल २०२६ रोजी नेपाळमधील…
अलिबागच्या रंगभूमीवर अभिनयाचा अविष्कार; राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत कलाकारांचा डंका! एकता इंटरप्रायझेस’ आणि ‘कलारंग’चा स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकीचाही जागर अलिबाग(रत्नाकर पाटील) मुंबईतील एकता इंटरप्रायझेस या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि सौ. एकता निखिलेश म्हात्रे यांच्या सौजन्याने तसेच कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२६’ नुकतीच अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या विविध शहरांतून आलेल्या कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते, ज्यामध्ये लहान गटात १८ आणि मोठ्या गटात १७ अशा एकूण ३५ स्पर्धकांनी विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि ज्वलंत विषयांवर…

