*अतिवृष्टीतही कर्तव्यावर ठाम – रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी 48 तासात सुरळीत केला NH-66*
प्रतिनिधी : दिपक सोनावणे
दिनांक 5 व 6 जुलै रोजी झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्ग NH-66 वरील सुकेळी खिंड वाकन, पाली फाटा येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पर्यायी मार्ग असलेल्या भिसेखिंड येथे दरड कोसळल्याने हजारो प्रवासी आणि अवजड वाहने महामार्गावर अडकून पडली होती.
अशा संकटकालीन परिस्थितीत रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ वाहतूक व्यवस्थापनाचे काम हाती घेतले. रस्त्यावरील पाण्याचा निचरा करणे, दरड हटवण्यासाठी समन्वय साधणे, तसेच अडकलेल्या नागरिकांसाठी जेवण, पाणी व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पोलिसांनी केले.
माननीय अप्पर पोलीस महासंचालक, वाहतूक – महाराष्ट्र राज्य, माननीय पोलीस अधीक्षक, रायगड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
*माननीय पोलीस उपाधीक्षक सौ. श्रीमंती दिघे मॅडम*, *माननीय पोलीस निरीक्षक श्री. विनोद माळवे साहेब*, रायगड विभाग, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाकन पोलीस केंद्र व सर्व पोलीस अंमलदार यांनी रात्रंदिवस काम करून वाहतूक नियमान केले आहे.
पोलिसांच्या सुनियोजित नियोजन आणि अथक प्रयत्नांमुळे केवळ 48 तासात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात यश आले. नागरिकांना सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी विशेष मदत कक्षही उभारण्यात आले होते.
गीतांजली भानुदास जगताप
प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस वाहतूक मदत केंद्र वाकण यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे



