Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»श्रीवर्धन मतदार संघात स्थानिकासाठी लढणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात गरज आहे.
राजकारण

श्रीवर्धन मतदार संघात स्थानिकासाठी लढणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात गरज आहे.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

श्रीवर्धन मतदार संघात स्थानिकासाठी लढणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात गरज आहे.

(प्रतिनिधी) श्रीवर्धन 
गेली 30 वर्षे अगदी शाळा कॉलेज पासून सामाजिक क्षेत्रात आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात सद्या गरज आहे. गेली अनेक वर्षे ते सामाजिक कर्यकर्ता म्हणून काम करीत आहेत. आमदार श्यामभाई सावंत यांच्या पासून ते आदिती तटकरे यांच्यासमवेत त्यांनी काम केलेलं आहे. म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव च्या समस्या त्यांनी पत्रकार म्हणून मांडल्या आहेत आणि त्या सोडवल्याही आहेत. मग तो घोणसे घाट असो, कि म्हासळ्याचा वादादित रस्ता असो. अनेक सरकारी प्रकारने त्यांनी बाहेर काढली आहेत. आपल्या स्थानिक सुटाव्यात यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. कृष्णा कोंबनाक यांच्या समवेत काम करतांना 5 तालुके त्यांनी पिंजून काढले आहेत. प्रत्येक तालुक्यात त्यांची माणसे आहेत.
मीडियाशी त्यांचे संबंध आहेत. सिस्टीमची चांगली माहिती आहे. मुद्दा कसा पेटवायचं प्रशासनाला कसे झुकवायचे यांचे जबरदस्त नॉलेज आहे. सद्या ते कोकण तालुका विकास संघटनेच्या माध्यमातून रोजगारं, एम आय डी सि., माणगांव लोकल ट्रेन साठी झटत आहे. ते त्यांच्या कामानिमित्त अर्धा देश फिरून आलेले आहेत. तिकडे कसा डेव्हलोप मेन्ट आहे. स्थानिक लोकांना कसा रोजगारं उपलब्ध होईल, स्थलांतर थांबेल याच्या साठी त्यांचा जीव तळमळतो आहे. ज्या पद्धतीने प्रशासनाने काम केले पाहिजे ते होतं नाही. ते करण्याससाठी त्यांनी प्रत्यक्ष सत्तेत जावे अशी म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगावकर त्यांना फोर्स करीत आहेत. ते चांगले लेखक आणि डिजाईनर आहेत. सुशिक्षित तसेच आपल्या स्थानिक प्रश्नासाठी झुंजणारे आहेत. रोजगार नसल्यामुळे गावेच्या गावी ओस पडली. पर्यटनातून. रोजगारं मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. सोशल मीडिया इंस्टाग्राम, फेसबुक, वर ते जनजागृती करीत असतात. लेख, कविता, रील्स, नाटक याद्वारे अनेक विषय त्यांनी मांडले आहेत. चांगले शिकले सवरलेलं असून गरिबीतून. वरती आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जाणीव आहे. प्रामाणिकपने त्यांनी काम केले आहे. अनेक लोकांनी त्रासही दिला मात्र त्यांनी ते सहन करून आपला वसा चालूच ठेवला आहे. पूर्वी गावी काय चाललंय माहिती पडत नसे त्यासाठी. त्यांनी रायगड मत वर्तमान पत्र काढले. रायगड जिल्ह्याच्या 15 तालुक्यात ते फिरलेले आहेत. स्थानिक लोकांच्यासाठी ते अनेक वर्ष् लढत आहेत. त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. त्यांचे सामाजिक विकासात्मक विचार लोकांना पटत आहेत. कारण सद्या रोजगारावर कोणचं बोलत नाहीत. भाविष्यात मतदार संघात बदल होईल. अपेक्षा होती तसें काहि 1996 ते 2026 मध्ये 30 वर्षात रोजगारासाठी काहि घडलेले नाही. रोह्यात, महाडमध्ये एमआयडीसी, कंपन्या आहेत. त्यामुळे तिकडे अगदी मस्त चाललंय. ते स्वाभिमानी आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे आहेत. मात्र काहि जनता त्यांना साथ देत नाहीत. याला कारण मुंबईकर मतदारांचे घाणेरडे राजकारण. मुंबईकर मतदार 5 वर्षातून एकदा येतात जो पक्ष गाड्या करतो, पैसे देतो त्यांना मतदान करतत आणि बिर्याणी खाऊन पुन्हा निघून जातात. जाब विचारत नाहीत. गेली 30 वर्षे हेच चाललंय. परिस्थिती जैसी थे आहे. हे कुठं तरी थांबले पाहिजे या विचारांचे ते आहेत. भाविष्यात रोजगारा साठी 1) म्हसळा – श्रीवर्धनच्यामध्ये एम.आय.डी.सि. आणण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करीत आहेत. 2) माणगांव लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन आलेले आहेत. 3) कलाकारांसाठी आणि विरुंगळ्यांसाठी थियेटरची मागणी. ते करीत आहेत. 4) पर्यटनातून गावात गावात रोजगारं देऊन पुढच्या पिढीला रोजगारासाठी मुंबईला जाण्यापासून त्यांना रोखयचे आहे. आणि स्थलांतर थांबवायचे आहे. सद्या ते स्थलानंतर थांबविण्यासाठी फिल्मवर काम करीत आहेत. अत्यंत साधा पण न्याय हक्कासाठी आक्रमक अश्या चांगल्या विचारांचा माणूस प्रत्यक्ष राजकारणात सत्तेत आल्यास नक्कीच सकारात्मक बदल घडेल यात शंकाच नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पनवेलमध्ये विजयाचा जल्लोष

May 4, 2026

तळा वडाची वाडी (मोहिते आळी)येथे सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा.

April 29, 2026

*राष्ट्रवादीला मोठा धक्का, अशोक धोत्रेंच्या नेतृत्वात शिवसेनेची ताकद वाढली;

April 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us