गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २०२६; आगरी समाज उत्कर्ष मंडळातर्फे रविवारी आयोजन
प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव
आगरी समाज उत्कर्ष मंडळ (रजि.) यांच्या वतीने आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह समाजातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
हा गुणगौरव सोहळा रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण माणेकजी गढधर म्युनिसिपल मराठी शाळा, गढधर बांध, सांताक्रुझ (प.), मुंबई – ४०० ०५४ असे आहे. आगरी समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. शालांत परीक्षा २०२५-२६ मध्ये ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी प्रकाश पनवेलकर 9869986557,संजय शेडगे 9833971636, राज जोशी 9920638860, भालचंद्र पाटील 9920413124 ह्या नंबर वर करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमाला आगरी समाजातील मान्यवर तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘शावरे नाच (लुंगवाले) श्री गणेश नाच मंडळ, धोंडवार’ यांचा विशेष कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
आगरी समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नामदेव मारुती पावशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत असून, उपाध्यक्ष जयवंत ना. पाटील, सचिव प्रकाश रा. पनवेलकर, खजिनदार अनिल ना. मोरे, उपसचिव विकास दा. पाटील, उपखजिनदार संजय ग. शेडगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सल्लागार कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि नव्या पिढीला शिक्षणाची प्रेरणा देणारा हा सोहळा आगरी समाजासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.



