तळा -तारणे रस्त्यावरील वळणावरअपघाताला मिळते निमंत्रण .तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर वाढण्याची गरज.
तळा -किशोर पितळे- दिल्ली -काँरिडोर आगरदांडा जेट्टी बंदराकडे तळा आगरदांडा मुरुड जाणारा शहरा जवळील तारणे अवघड वळणावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी ८मे२५ रोजी एस्.टी आणी कंटेनर यामध्ये याच वळणावर गंभीरअपघात होऊन सहा जणांना जीव गमवावा लागला तर काही जण गंभीररित्या जखमी झाले.दहा-पंधरा दिवसापूर्वी मिक्सर ट्रक पलटी झाला सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. सदर रस्ता (TIPL) ठाकूर ईन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ने काम केले आहे.तळा-तारणे तीव्र उतार असून पुढे अवघड वळण आहे.अधिक क्षमता असलेली मोठी वाहने जेट्टी कडे जात असल्याने वळणाजवळच स्पीड ब्रेकर असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत सदर उतारावर अधिक स्पीड ब्रेकर टाकले तर अपघाताची शक्यता कमी होईल असे जेष्ठ जाणकार चालकांचे म्हणणे आहे.या वारंवार होतअसलेल्या अपघातालाच कंपनीजबाबदार असल्याचे बोलले जात आहे रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम झाले आहे.रस्ता रुंदीकरणात अनेक वृक्ष तोड झाल्याने बोडके झाले आहेत.वृक्ष रोपण करणे संगोपन करणे हे बंधनकारक आहे असे असताना याकडे कंपनी ने दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना व वाहन चालकांना जीव मुठीत धरून चालवावे लागत आहेत तरी सदर उतारावर अधिक रबरींग स्पीड ब्रेकर वरुन टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे.


