कर्नाला -फळशेत गावात अवकाळी पावसाने अनेक घराचे नुकसान.शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी.
तळा-किशोर पितळे-
तळा तालुक्यातील कर्नाळा फळशेत गावाला अवकाळी गारासह वीजेच्या कडकडाटा सह आलेल्या पावसाने झोडपून काढले अचानक आलेल्या पावसाने सर्वाची त्रेधातिरपीट उडाली घराचे पत्रे,कौले ढापे,भिती कोसळल्या,लोखंडी पत्रे उडून घरे उध्वस्त झाल्याचे वास्तववादी चित्र स्पष्ट दिसतआहे.शेतावरील वाडे जमीनदोस्त झाले असून अनेक ठिकाणी मोठी झाडे तुटून पडल्याने वाहतूकीचा मार्ग बंद झाला. ढोरांच्या वैरीणी भिजल्या या पावसाने घराची छपरे दुसऱ्या घरावर उडून नुकसान झाले आहे. त्याबरोबर आंबा,काजु फळ बागाचे देखील नुकसान झाले आहे. बाजती आंबा कलमे जमीनदोस्त झाली आहेत.हाताशी आलेल्या नगदी आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले त्यात लग्न सिझन असल्याने लग्नाचे मंडप तुफानी वादळाचे भक्ष्य ठरले. मंडप डेकोरेशन चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसाने रौद्र रूप एवढे भयानक होते कि आज पर्यंत च्या इतीहासात कधी असे झाले नव्हते असे जेष्ठ मंडळी कडून ऐकायला मिळत आहे.कर्नाळा येथील१४वर्षाचा युवक कु.वेदांत भोसले याचा विज पडून मृत्युमुखीपडला.तालुक्यातील रहाटाड, मांदाड, गिरणे,मालाठे,टोकार्डे तळा शहर जोगवाडी वस्ती वर मोठ्या प्रमाणावर घराची नुकसान झाले आहे.याठिकाणची पण परिस्थिती वेगळी नाही.
अचानक पावसाने झालेल्या नुकसाची शासनाने सरसकट पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.