नागरिकांनी स्व जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करावे–तहसीलदार स्वाती पाटील.
तळा-किशोर पितळे-
राज्यात १मे२६पासून जनगणना उपक्रम राबविण्यात येत असून जनगणना २०२७ हि जनगणना जवळपास अनेक वर्षानी होत असून १मे ते१५मे या कालावधीत स्व -जनगणना मोबाईल वर https://se.census.gov.in करून प्रशासनाला सहकार्य करावे १६मे ते १४ जून घरोघरी जनगणना केली जाणार असूनप्रगणक,पर्यवेक्षक घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील त्यांनी विचारलेल्या प्रश्रांची व्यवस्थित माहिती भरून द्यावी.या जनगणनेने देशाच्या विकासाला गती गती मिळेल “चलातरआपली जनगणना जबाबदारी पार पाडू या.,जनगणनेत सहभागी होवू या” या प्रमाणे प्रशासनाला सहकार्य करावे.शासनाची योजना आखणी शिक्षण, आरोग्य, संसाधन वाटप रोजगार, पायाभूत सुविधा यासाठी आवश्यक ठरणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असे तळा तहसीलदार स्वाती पाटील यांनी आवाहन केले आहे.


