*आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास.
*शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
तळा -:किशोर पितळे:-(प्रतिनिधी)
केंद्र सरकारने आधार कार्ड देशातील सर्व जनतेला सक्तीचे केले असल्यानेजनतेला आधारा शिवाय पर्याय नाही परंतु केंद्रसरकारने आधार कार्ड काढताना नेमलेल्या कर्मचारी किंवा एजन्सी कर्मचाऱ्यानी जन्म तारीख न टाकता फक्त वर्ष टाकले, सालात फरक,नांव,आडनाव इंग्लिश मध्ये स्पेलींग मिस्टेक ,W च्या ठिकाणी V अशा असंख्य चुकांचा त्रासदायक आधार हा मनस्ताप झाला आहे. वर्ष किंवा तारीख बदलण्यासाठी शाळेचा दाखला हा शासन दरबारी ग्राह्य धरला जातो असे असताना रिजेक्टकेला जातो.शाळेच्या दाखल्यावरील खरी तारीख ठरवण्या साठी जन्म दाखला पुरावा मागणी केली जाते.जन्म नोंद सक्ती हि नजीकच्या काळात केली आहे यापूर्वी जन्म नोंद केलेली नसली तरी जन्म झाला ती खरी नाही का ?असा प्रश्र ऐरणीवर येत आहे. वर्ष बदलण्यासाठी पर्याय १) पासपोर्ट२)शासन पेन्शन स्कीम सर्टिफिकेट ३) मार्क लिस्ट असे ठेवले आहेत परंतु(मार्कलिस्टवर किंवा पेन्शन सर्टिफिकेट वर जन्म तारीख नसते)सर्व सामान्य जनतेकडे वरील गोष्टी नसतात.जन्म तारीख ग्राह्य धरण्यासाठी पँन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, हे पर्याय साँफ्टवेअरला न ठेवल्याने त्रासदायक झाले आहे.जन्म तारीख हिच असल्याची पंचायत समिती अर्ज,स्वंय घोषित सत्यप्रतिज्ञा पत्र,शाळा सोडलेला दाखला, तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारीचे पत्र या कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच तहसीलदार याच जन्म पुराव्यावरूनच दिलाजातो. मग आधार घेण्यासाठी आणी देण्यासाठी जनतेला शासन करीत असल्याचे दिसून येत आहे. आधार कार्ड अपडेट्स साठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे म्हणजेच सदर आधार कार्ड दुरुस्ती करणे अतीशय क्लिष्ट झाले आहे शासन नियमात बदल करतातआणी त्याप्रमाणे संगणकवर लोड करतात त्यामुळे त्रास होत आहे. शासनाने जी आर काढून जन्म दाखला सक्ती पुर्वीचा जन्म दाखला सर्व क्षेत्रात ग्राह्य धरले पाहिजेत अशी जनतेतून मागणी केली जात आहे.