*नागोठण्यातील ऐतिहासिक कमानिची तोडफोड; परवानगीशिवाय काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी*
प्रतिनिधी : सुदर्शन कोटकर
नागोठणे येथे अलीकडेच घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (ठाकरे गट)रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, “जनतेने तुम्हाला शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे, वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सदस्य म्हणून नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेची जी भूमिका आहे – ती संघर्षाची आणि न्याय मिळवून देण्याची – ती कायम लक्षात ठेवावी.”
परवा घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, रिलायन्स कंपनीच्या अवजड वाहतुकीसाठी नागोठणे येथील एक ऐतिहासिक कमान कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडण्यात आली. या कामासाठी ना, ग्रामपंचायत, ना पंचायत समिती, ना जिल्हा परिषद किंवा शासन यांची कोणतीही मंजुरी घेण्यात आली होती.का
“नागोठणेकरांची ओळख पुसण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल, तर त्याविरोधात आम्ही ठामपणे उभे राहू. कायदेशीर प्रक्रिया न पाळता मनमानी करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या प्रकरणी स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र नाराजी असून संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पुढील काळात या मुद्द्यावर आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे