Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आवश्यक : – शॉर्न क्लार्क यांचे ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालया’त प्रतिपादन.
ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आवश्यक : – शॉर्न क्लार्क यांचे ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालया’त प्रतिपादन.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आवश्यक : – शॉर्न क्लार्क यांचे ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालया’त प्रतिपादन.

कोलाड (श्याम लोखंडे) कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी शारीरिक उपचारांसोबतच आध्यात्मिक उपाय करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधक. शॉर्न क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी केले. शिरोडा येथील ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय’ व संशोधन केंद्रात ‘उपचारांमध्ये अध्यात्माची भूमिका’ या विषयावर आयोजित अतिथी व्याख्यानातून दोघांनी उपस्थित पदव्युत्तर विद्यार्थी यांना दिले.

सदरच्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश कोरडे आणि गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेदिकच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीसह सुमारे १०० पदव्युत्तर विद्यार्थी अन् आयुर्वेद विषयातील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन पथकाने आधुनिक ऑरा आणि ऊर्जा स्कॅनर्सच्या माध्यमांतून सिद्ध केलेले निष्कर्ष उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी संशोधन पथकाने सांगितले की, गेल्या २५–३० वर्षांत वैद्यकशास्त्रात अध्यात्माची गरज वाढत चालली आहे. त्यामुळे वर्ष १९९० च्या सुरुवातीस अमेरिकेतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यात्म-आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आणि एका सर्वेक्षणानुसार आज ते सुमारे ९०% महाविद्यालयांमध्ये समाविष्ट झाले आहेत. तथापि, प्राचीन भारतीय आयुर्वेदशास्त्रानुसार, कर्म (प्रारब्ध) हे रोगांचे एक मुख्य मूळ कारण मानले गेले आहे, तसेच वात, पित्त आणि कफ यांचे असंतुलनही कारणीभूत असते. आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये सत्त्व गुण वाढवणे आणि रज-तम गुण कमी करणे हे सुखी व निरोगी जीवनासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

संशोधन पथकाने पुढे सांगितले की, त्यांनी आधुनिक ऑरा आणि ऊर्जा स्कॅनर्स, तसेच संशोधन पथकातील सदस्यांच्या प्रगत सहावे इंद्रियाच्या साहाय्याने अनेक संशोधन केले. त्यांच्या निष्कर्षानुसार जीवनातील ५०% पेक्षा जास्त समस्या या पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. प्रारब्ध हे त्यामागील मुख्य कारण असून, गंभीर आजारही कर्मानुसार ठरलेले असतात. नकारात्मक ऊर्जा वैद्यकीय समस्यांना उद्भवू शकते, ती वाढवू शकते किंवा योग्य निदानालाही अडथळा आणू शकते. अशा वेळी अनुभवी आयुर्वेद वैद्य ‘भूत नाडी’ ओळखून नकारात्मक ऊर्जा सक्रिय आहे का, हे समजू शकतात आणि आध्यात्मिक उपायांद्वारे त्यावर मात करण्यात साहाय्य करू शकतात.

 

कोणत्याही वैद्यकीय समस्येमागील तिसरा आध्यात्मिक घटक म्हणजे आपल्या पितरांचा त्रास असू शकतो. एक्झिमा, अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी किंवा गर्भपात, तसेच व्यसनाधीनता यांसारख्या समस्या केवळ पारंपरिक औषधांनी पूर्णपणे बऱ्या होऊ शकत नाहीत. आत्मउपाचार साधने, नियमित साधना आणि सात्त्विक जीवनशैली यांसारखे आध्यात्मिक उपाय सत्त्व गुण वाढवण्यासाठी आणि सर्वांगीण आरोग्य प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

संशोधनच्या निष्कर्षाविषयी त्यांनी सांगितले की, आपल्या धर्मानुसार देवाचे नामस्मरण करणे, १५ मिनिटांचे मिठाच्या पाण्याचे उपाय, स्वभावदोषांवर मात करणे आणि ताजे शिजवलेले शाकाहारी सात्त्विक अन्न सेवन करणे हे सर्व आध्यात्मिक समस्यांवर (वैद्यकीय समस्यांसह) प्रभावी आत्मउपचार साधने ठरू शकतात.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

May 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us