Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»आंबेवाडी–निवी कालवा घनकचऱ्याच्या विळख्यात; साफसफाईवर प्रश्नचिन्ह, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्र
ताज्या बातम्या

आंबेवाडी–निवी कालवा घनकचऱ्याच्या विळख्यात; साफसफाईवर प्रश्नचिन्ह, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्र

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 27, 2026Updated:March 27, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

आंबेवाडी–निवी कालवा घनकचऱ्याच्या विळख्यात; साफसफाईवर प्रश्नचिन्ह, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्र

 

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

आंबेवाडी ते निवी कडे जाणाऱ्या रायगड पाटबंधारे विभागाच्या कालव्याला परिसरातील घनकचऱ्याने वेढा घातल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळित झाला असून, प्रत्यक्षात साफसफाई झाली का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाढते तापमान आणि प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा भीषण उन्हाळ्यात किमान पाणी सोडावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र, प्रत्यक्षात कालव्याची अवस्था पाहता यंदाही पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
आंबेवाडी परिसरातून जाणाऱ्या या कालव्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी सोडले गेले नसल्याने नागरिकांनी त्याचा वापर डम्पिंग ग्राउंड म्हणून केला. परिणामी कालव्यात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे. सध्या शेतकऱ्यांकडून शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी मागणी जोर धरत असून काही ठिकाणी कामे सुरू असल्याचे दिसते. मात्र ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी अधिकाऱ्यांकडून आश्वासने दिली जातात, परंतु प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावर्षीदेखील डिसेंबर-जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर किमान तीन महिने तरी पाणी सोडावे, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.
आंबेवाडीपासून पुढे संभे गावापर्यंत कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
“कालवा शेतकऱ्यांसाठी तयार झाला, मात्र अनेक वर्षांपासून पाणीच मिळत नाही. शेतकरी संघटित नसल्याने ही परिस्थिती कायम आहे,” अशी खंत संभे येथील शेतकरी मिलिंद पवार यांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us